शेतकऱ्यांचे सर्व सरसगट कर्ज माफी द्या वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती चा शासनाला ठराव व निवेदन…
महेंद्र हरले

वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या करीता कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभे मध्ये सर्वानुमते ठराव करून ते शासनाला पाठवावा असे ठरवून ते ठराव सह निवेदन तहसीलदार वरूड यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना देवेन्द्रजी फडणवीस यांना पाठविण्यात आला शेतकऱ्यांना फडवणीस सरकारचे काळात कर्ज माफी देण्यात आली ती कर्ज माफी अपूर्ण स्वरूपाची व दोषपूर्ण होती त्या मध्ये बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना कर्ज माफी मिळाली नाही काही शेतकऱ्यांनी कर्ज माफी करीता अर्ज केले त्या मध्ये पात्र झाले परंतु त्या शेतकऱ्यांना ची कर्ज माफीची रक्कम आज पर्यंत जमा झालेली नाही त्या मूडे सर्व शेतकरी या शासनाचे चुकीचे धोरण मुळे कर्ज माफी मध्ये अडकले त्या नंतर ठाकरे सरकारचे काळात पुन्हा शेतकरी यांना कर्ज माफी दिली गेली ती सुद्धा अपूर्ण व दोषपूर्ण होती त्या मध्ये शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2015 नंतर कर्ज उचल केली त्याच शेतकऱ्यांना कर्ज माफी साठी पात्र केले गेले होते त्यामुळे फडवणीस सरकारचे काळात जे कर्ज माफी त्या मधून सुटलेले बरेच शेतकरी होते आणि ते 2015 पूर्वीचे असल्याने ठाकरे सरकारांचे काळात कर्ज माफी करीता अपात्र ठरले सुटले गेले व एप्रिल 2015 नंतरचे बरेच शेतकरी पात्र राहून सुद्धा ठाकरे सरकारने दिलेले कर्ज माफी मध्ये बरेच पात्र शेतकरी सुटले गेले या दोन्ही फडणवीस व ठाकरे सरकारचे कडातील शेतकरी कर्ज माफी शेतकऱ्यांचे सोईची झाली नसल्याने व शासनाने कर्ज माफीची ची घोषणा केली व शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने बरेच पात्र लाभार्थी यांनी आज पर्यंत कर्ज भरले नाही त्या मुळे शासनाचे या चुकीचे कर्ज माफीचे धोरणा मूड बरेच शेतकरी अडचणीत सापडले त्या मुळे आता सध्याचे फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी देऊन शेतकऱ्यांनाच सातबारा कोरा करावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती वरूड चे संचालक मंडळाने एक मुखी सर्वानुमते ठराव पारित करून महाराष्ट्र शासनाला पाठविला आहे कारण सध्या असलेले शासनाचे निवडणुकी दरम्यान त्यांचे जाहीरनाम्यात सुद्धा शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी देऊन सातबारा कोरा करू असे आश्वासन होते त्या अनुषंगाने शासनाने शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी ठराव व निवेदन देऊन कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती नरेंद्र उर्फ बबलू शेषरावजी पावडे उपसभापती बाबाराव मांगुळकर संचालक राजेश गांधी वनराज कराळे सुजित उर्फ छोटू पाटील प्रमोद उर्फ बाळू पाटील बाबाराव लोखंडे अमित कुबडे जाबीर खा जहागीर खा उर्फ झाबु शेठ प्रशांत पाटील प्रवीण उर्फ शेशू मानकर अंकुश पाटील मुकेश देशमुख प्रणय सोंडे नरेंद्र पांडव हिराकांत उईके संचालिका अर्चना मुरूमकर रोशनी मानकर सचिव नंदकिशोर बोडखे शेतकरी विकास भोंडे अमोल उपासे ज्ञानदेव पाटील बाळासाहेब ताठोडे निवेदन देते वेळी उपस्थित होते झालेला ठराव पारित शासनाला पाठविला असून शासनाचे गांभीर्य पूर्वक व शेतकऱ्याची हालकीची परिस्थिती लक्षात घेऊन सरसगट कर्ज माफी देऊन सातबारा कोरा करावी अशी मागणी केली आहे