सारंग हरले यांची भूमी अभिलेख महाराष्ट्र शासनमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून निवड
महेंद्र हरले

सारंग हरले यांची भूमी अभिलेख महाराष्ट्र शासनमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून निवड
वरुड:तालुक्यातील जरुड गावचे कर्तृत्ववान तरुण सारंग भाऊराव हरले यांनी स्पर्धा परीक्षेत मोठे यश संपादन करत भूमी अभिलेख महाराष्ट्र शासनमध्ये उप अधीक्षक (राजपत्रित) या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनी शालेय जीवनापासूनच मेहनती, जिद्दी व चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादित केल्यामुळे वरुड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सारंग याचे प्राथमिक शिक्षण नगर परिषद शाळेत शे. घाट येथे पूर्ण झाले. त्यानंतर दहावी NTR हायस्कूल व ११ , १२ वी जागृत विद्यालय वरुड येथून पूर्ण झाले. तसेच B.Tech (Civil) ही प्रावीण्यप्राप्त पदवी VNIT नागपूर मधून पूर्ण केली. हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षेचे क्लास करून UPSC व MPSC परीक्षा दिल्या. ते सध्या मुंबई येथे STI (GST) या पदावर कार्यरत आहे. तथापि सन २०२३ च्या MPSC राज्यसेवा परीक्षेतून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यशस्वीरीत्या देऊन उप अधीक्षक या पदावर त्यांची निवड झाली आहे.
सारंग हरले यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या जीवनातील ध्येय गाठता येते हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
आपल्या यशाचे श्रेय ते आपल्या कुटुंबाला, समाजबांधवांना आणि आपल्या सर्व शिक्षकांना देतात.
तसेच आपल्या यशाचे विशेष श्रेय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतात कारण संविधानिक तरतुदीमुळे शिक्षण घेण्याची व उच्च पदाची नोकरी प्राप्त करण्याची संधी मला बाबासाहेबांनी दिली.