लोहगाव ते खंडोबाच्या खराब रस्त्यामुळे लोकांचे जीवन अस्तव्यस्त- प्रशासन बेखबर
पुणे प्रतिनिधी

पुणे:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांच्या गृह जिल्ह्यात पुणेकरांना दररोज अनेक समस्यांना समोर जावं लागते,
ज्यामधे बरोबर रस्ते नाहीत, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची बरोबर सोय नाही,
बदमाश्यांचा मोठा दबदबा संपूर्ण शहरात पाहावायस मिळतो त्यामुळे सर्वसामान्य जनता भीतीच्या वातावरनात जगत आहे,
सरकारी फंडाचा विकासकामाच्या नावावर वारंवार दुरुपयोग होतो परंतु विकास होताना कुठेच दिसत नाही,
लोहगाव जे अति महत्वाचे ठिकाण आहे ज्या लोहगावच्या नावावर पुणेचे विमानतळ आहे, याच परिसराला लागून विमाननगर हे आय.टी. चे मोठे हब आहे,
परंतू या लोहगावातील तसेच लागूनच असलेल्या वस्त्यातील जनतेला दररोज खूपच भयानक संकटकांणा समोर जावं लागत आहे.
ज्यामध्ये आज दर्शन एक्सप्रेस न्यूज ची टीम जेव्हा लोहगाव ते खंडोबा मार्गाचा दौरा करायला गेली असता हा सर्वच उघड पसारा दिसून आला.
तेव्हा स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता तेव्हा त्यांनी सांगितले की स्थानीय आमदार तसेच महानगरपालिका,नगरसेवक आणि पोलीस आयुक्ताला अनेक तक्रारी देऊन सुद्धा यावर कोणताही तोडगा निघाला नाही.
या परिसरात रस्ते तर बिल्कुलच नाहीत त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर घाण चिखल आणि मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत,
त्यामुळे इकडे ओला उबेर सारखे वाहन जात नाहीत,
शाळेकरी मुलांसाठी शाळेच्या बसेस जात नाहीत त्यामुळे लहान मोठ्या विद्यार्थ्यांना त्या चिखलातून पायी प्रवास करावा लागतो.
दररोज अनेक लोकांचे या खराब रस्त्यामुळे अपघात होऊन गंभीर स्वरूपात जख्मी होत आहेत,
या सर्व समस्यांचे निराकारण महानगर पालिका तसेच लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कधी करतात यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.