24 वर्षीय महिलेला 8 महिन्यात उलट्या थांबता थांबत नव्हत्या; टेस्ट रिपोर्ट पाहून डॉक्टरांना बसला धक्का
विशेष प्रतिनिधी

आई होणं यापेक्षा जगत दुसरं कुठलं सुख नाही. पण महिला जेव्हा गर्भवती असते तेव्हा 9 महिने अतिशय महत्त्वाचे असतात. या 9 महिन्यात गर्भवती महिलेला त्याच्या पोटात वाढ असलेल्या बाळाची काळजी घ्यायची असते. त्यामुळे तिला सर्व प्रकारच्या आजारापासून दूर राहायचं असतं. गर्भवस्थेतील तीनही टप्पे अतिशय काळजीपूर्वक महिलेला राहावे लागते. त्या महिलेचं एक चुकीचं पाऊल हे आई आणि बाळ या दोघांच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतं. गर्भवस्थेत महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे तिला तिच्या शरीरात दिसणाऱ्या प्रत्येक लक्षणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असतं. गर्भवती महिलेला कोणतेही वेगळं किंवा धोकादायक लक्षणं दिसल्यास त्यांनी डॉक्टरांकडे जावं.
एका 24 वर्षीय महिलेला प्रेग्नेंसीच्या 8 महिन्यात उलट्या होत होत्या. खरं तर गर्भवस्थेत गर्भवती महिलेला उलटी होणे हे सामान्य लक्षणं आहे. पण या महिलेच्या उलट्या काही केल्या थांबत नव्हत्या. त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली असता तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यानतंर तिच्या काही चाचण्या करण्यासाठी सांगण्यात आलं. या चाचण्याचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला.
डॉ. रिचा तिवारी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर या घटनेबद्दल सांगितलं आहे. डॉ. रिचा यांनी एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितलं. ही माहिती प्रत्येक महिलेला असणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी या व्हिडीओमध्ये सांगितले की, ही 24 वर्षांची गर्भवती महिला वारंवार उलट्या होत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आली. ती म्हणाला की तिला सतत उलट्या होत आहे आणि तिला भूक लागत नाही. पोटात जडपणा येत होता आणि काही दिवसांपूर्वी तिला तापही आला होता. टेस्ट केल्यानंतर त्याचत असे दिसून आलं की तिला गंभीर कावीळ झाला होता आणि तिच्या शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण खूप जास्त होतं.
यासोबतच डॉक्टरांनी असेही सांगितले की महिलेला हेपेटायटीस ई विषाणूचीही लागण झाली आहे. गर्भधारणेदरम्यान हा संसर्ग खूप धोकादायक मानला जातो. या संसर्गामुळे सुमारे 30 ते 80 टक्के महिलांचा मृत्यू होतो. यामध्ये, तीव्र यकृत निकामी होतं.
डॉक्टर पुढे म्हणाल्यात की, हा विषाणू घाणेरडे पाणी आणि घाणेरडे अन्नामुळे शरीरात पसरतो. त्या गर्भवती महिलेने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून बाहेरचे अन्न खात होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि तिची प्रसूती अकाली करण्यात आली. डॉक्टरांनी सल्ला दिला की गर्भवती महिलांनी विशेषतः बाहेरील अस्वास्थ्यकर अन्न चुकूनही खाऊ नयेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, गर्भधारणेदरम्यान, विशेषतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत, हिपॅटायटीस ई, तीव्र यकृत निकामी होणे, गर्भाचा मृत्यू आणि अगदी मृत्यू देखील कारणीभूत ठरतं. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत हेपेटायटीस ई झालेल्या सुमारे 20 ते 25 टक्के महिलांचा मृत्यू होतो. फोर्टिसहेल्थकेअरच्या मते, या संसर्गाची लक्षणं 2 ते 6 आठवड्यांनंतर दिसायला लागतात. कधीकधी रुग्णाला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण कधीकधी त्यामुळे ताप, मळमळ, उलट्या, डोळे पिवळे पडणे, भूक न लागणे, थकवा आणि पोटदुखी होऊ शकते.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘Darshan Express News‘ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)