सामाजिक

पुरोगामी संत आणि विचारवंतात समन्वयकाची गरज -अशोक सरस्वती

महेंद्र हरले (प्रतिनिधी)

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

वरुड:करुणा बुद्ध विहार वरूड येथे अशोकभाऊ सरस्वती यांचे व्याख्यान संपन्न झाले,

संत गाडगेबाबा विचार प्रबोधन यात्रा महोत्सव समितीतर्फे पुरोगामी संत आणि विचारवंत यांच्या अनुयायात समन्वयाची गरज या विषयावर प्रबोधन यात्रा महोत्सवाचे आयोजक अशोकभाऊ सरस्वती यांचे व्याख्यान संपन्न झाले. सर्व पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारे लोक मात्र एकत्र येऊन कार्य करीत नाही असा खेद व्यक्त करीत आता तरी आम्ही जाती घर्माच्या भिंती तोडून एकसंघ कार्य केले पाहिजे. तरच देशाचे संविधान वाचवू शकतो.असा विचार त्यांनी मांडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी तेजोदिप्त यांनी केले तर प्रास्ताविक चंद्रशेखर अढाऊ सर यांनी केले कार्यकमाचे अध्यक्ष धम्मचारी बोधिनंद्न होते. पूजेचे नेतृत्व धुताले ताई, लक्ष्मीताई मेश्राम यांनी केले.विनोद बागडे यांनी सुंदर आवाजात आपली डियर बाबा ही गझल सादर केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मचारी श्रद्धादित्य इंजि.डबरासे ,माणिकराव बागडे इत्यादी नी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन करून धम्मचारी कुशलसत्व यांनी केला


Share
ही बातमी वाचा.  भारतीय बौद्ध महासभा मलकापूर च्या वतीने भीमा कोरेगाव शोर्य दिन उत्साहात साजरा

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.