किसान न्याय हक्क संघर्ष समिती व शेतकरी आक्रमक… नारेबाजी करत महसूल मंत्र्यांना दिले निवेदन
महेंद्र हरले

वरुड :गारपीटने रखडलेल्या अनुदान करीता किसान न्याय हक्क संघर्ष समिती व शेतकऱ्यांनी आक्रमक नारेबाजी करत महसूल मंत्र्यांना निवेदन वरुड तालुक्यातील लोणी व राजुरा बाजार या महसूल मंडळात माहे एप्रिल 2024 मध्ये गारपीट होऊन संत्रा व मोसंबी फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाने दि. 2 ऑगस्ट 2024 ला शासन निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले या अनुदानाकरता शेतकऱ्याकडून के वाय सी सुद्धा करून घेण्यात आल्या होत्या परंतु शासन निर्णयात हंगामाचा चुकीचा अर्थ लावून 3 हेक्टर वरील शेतकऱ्यांचे अनुदान मंत्रालय स्तरावरून थांबवण्यात आले. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात किसान न्याय हक्क संघर्ष समितीने शासन व प्रशासन स्तरावर याबाबत आवाज उठवीला. आमरण उपोषण सुद्धा केले परंतु सतेतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी किसान न्याय हक्क संघर्ष समितीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन . लोकप्रतिनिधी व शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज किसान न्याय हक्क संघर्ष समितिचे पदाधिकारी व शेतकरी यांनी शासनाच्या वरुड तहसील कार्यालय येथे महाराजस्व अभियाना मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्यसभा खासदार मा. श्री. डॉ. अनिलजी बोंडे, व आमदार मा.श्री.उमेशभाऊ यावलकर यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना खासदार आमदार यांनी शेतकऱ्यांचे महत्वाचे मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आरडाओरडा करून आक्रमकपणे गारपिटीचे रखडलेल्या अनुदानाची मागणी लावून धरली शेतकऱ्यांची आक्रमकता लक्षात पालकमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मंगळवार दिनांक 6/5/2025 रोजी मुंबई येथे होणाऱ्या कॅबिनेट बैठकी मध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सदर निवेदन देतानी किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे तुषारभाऊ निकम, चंदूभाऊ वानखडे, मोहनभाऊ खुजे, देवेंद्रभाऊ शेळके,निरंजनभाऊ घाटोळे, स्वप्निल खांडेकर, शिवाजी ठाकरे रुपरावजी लव्हाळे अरविंदभाऊ पावडे, विवेकभाऊ पावडे, सर्वेशभाऊ ताथोडे, पांडुरंगजी कुरवाडे,निलेशभाऊ पावडे,नामदेव दोड, अजयभाऊ काचरे, रवींद्रभाऊ ताथोडे, महेंद्रभाऊ काचरे, मधुकरभाऊ ताथोडे, प्रवीण ना.बहुरूपी, विष्णूभाऊ वानखडे, संदीपभाऊ नेरकर, प्रदीपभाऊ आगरकर, व परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.